न्यायमूर्ती रानडे हे एकोणिसाव्या शतकातील अनेक चळवळींचे आधारस्तंभ होते. स्वातंत्र्य चळवळींबरोबरच सामाजिक, राजकीय, धार्मिक, नैतिक, औद्योगिक, शिक्षणविषयक विचारही ते करीत असत. निर्भीड न्यायमूर्ती म्हणून त्यांची ख्याती होती. त्या काळातील कर्मठपणाला त्यांनी कधी थारा दिला नाही. म्हणून तर घरच्यांचा विरोध पत्करून त्यांनी पत्नी रमाबाईंना लिहायला, वाचायला शिकविले.
रमाबाई रानडे या न्यायमूर्ती रानडे यांच्या फक्त पत्नीच नव्हत्या, तर त्यांच्या छाया होत्या. त्यांनी स्वतंत्रपणे लिहिलेले ‘आमच्या आयुष्यातील काही आठवणी’ हे आत्मचरित्र वाचताना रमाबाई यांचे व्यक्तिमत्त्व किती प्रभावी होते हे लक्षात येते. आपल्याला घडविणाऱ्या पतीचे गुणगान त्यांनी यात केले आहे.
रानड्यांचा पूर्वेतिहास, न्यायमूर्तींचे सार्वजनिक कार्य, याविषयी लेखन केले आहे. मुख्य भर आहे, तो त्यांच्या कौटुंबिक आठवणींवर. पत्नीने पतीबद्दल लिहिलेल्या या ग्रंथात न्यायमूर्तींचा स्वभाव, आयुष्यक्रम वाचायला मिळतो. या दोघांच्या आठवणीतून त्यांचे श्रेष्ठत्व अधोरेखित होते.
पुस्तक : आमच्या आयुष्यातील काही आठवणी
लेखक : रमाबाई रानडे
प्रकाशक : वरदा प्रकाशन
पाने : २७२
किंमत : ३०० रुपये
(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)